AUDIOBOOK

About
एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या सांध्यावर भारतात ब्रिटिश सरकारचा एकछत्री अंमल होता. या इंग्रज राजवटीच्या विरोधातला लढा हळूहळू तीव्र होत असतानाच दुसऱ्या बाजूला आणखी एक महत्वाचं स्थित्यंतर भारतात घडून येत होतं. ते स्थित्यंतर म्हणजे भारतात झालेली प्रबोधनाची चळवळ. महाराष्ट्रात महात्मा फुले यांच्यापासून जे प्रबोधन पर्व सुरू त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कळस चढवला. या प्रबोधन पर्वातलं महत्त्वाचं पुष्प म्हणजे राजर्षी शाहू महाराज! भारतात झालेल्या सुधारणावादी क्रांतीचा इतिहास छत्रपती शाहूंच्या नावाशिवाय अपूर्ण आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. यंदाचं वर्ष म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचं स्मृतीशताब्दी वर्ष! त्यानिमित्त त्यांचं कार्य काय होतं आणि आजपर्यंत त्याचा ठसा कसा आणि कुठे जाणवतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया…