AUDIOBOOK

About
शेतीचा प्रश्न हा प्रामुख्याने आर्थिक आहे आणि त्यातून निर्माण होणा-या सामाजिक समस्या अनुषंगिक आहेत ही टिळकांची भूमिका आहे. डिसेंबर १८९२ मधील एका निबंधात त्यांनी लिहिले आहे की शेतक-यांस लिहिता वाचता येऊन त्यांस आपल्या ख-या स्थितीचे ज्ञान व्हावे, जे काही पैसा दोन पैसे त्यांच्याजवळ शिल्लक राहिल ते व्यवस्थेने राखून ठेवण्यास त्यांची सोय असावी आणि जमिनीचे हातहातभर तुकडे करून कोणासही आपल्या हिश्शाची योग्य किंमत मिळू नये अशी स्थिती तरी निदान न येण्याबद्दल कायद्यात काही तजवीज करावी हे सरकारचे कर्तव्य आहे.... हा सल्ला १३० वर्षांनंतर आजच्या सरकारलाही लागू पडतो....