About
गावकुसातील जितराबं' हे ग्रामीण भागातील १९९० च्या दशकातील समाजातील उपेक्षित लोकांचा जीवनपट आहे. ग्रामीण भागातील अठरापगड जाती- जमातीतील लोक, त्यांचं खडतर जीवन, तरीही त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन या पुस्तकातून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. गावकुसातील हे जितराबं लेखकाला आयुष्याच्या विविध टप्प्यांवर भेटलं आणि लेखकाच्या जीवनावर प्रभाव पाडून गेलं.
